कृषि विषयक सल्ला
जूनी पाने काढणे
कपाशीचे पीक ६० दिवसांचे असतांना झाडांना ११ ते १३ फांद्या आलेल्या असतात.
यावेळी शेंड्याकडील तीन फांद्या सोडून झाडांवरील इतर फांद्यांखालील जूने मोठे पान काढावे.
जास्तीत जास्त ७ ते १० पाने एका झाडाची निघतात.
पाने शेतातच पडू द्यावीत.
या पद्धतीमुळे उत्पादनात निव्वळ २०% पर्यंत वाढ होते.
संपूर्ण झाड मोकळे होत असल्यामुळे जून्या पानांखाली लपून बसणा-या कीडींपासून व रोगांपासून संरक्षण तर होतेच त्याच बरोबर संपूर्ण खोड व फांद्या सूर्यप्रकाशात आल्यामुळे बोंडे लागण्याचे प्रमाण वाढते.
*कपाशीमध्ये संजीवकांचा वापर: संजीवकांचा वापर हा लागवड अंतराशी निगडीत आहे*.
लागवड अंतर ५ X १ फूट किंवा यापेक्षा जास्त असल्यास लिहोसीनची फवारणी लागवडीपासून ६० दिवसांनी १० लिटर पाण्यात २ मिली या प्रमाणात करावी.
यानंतर पीक ९० दिवसांचे असतांना जीए १० पीपीएम व १% युरीयाची फवारणी करावी.
लागवड अंतर कमी असल्यास व जोड ओळ पद्धतीमद्धे या फवारण्या १० दिवस अगोदर (म्हणजेच ५० दिवसांनी व ८० दिवसांनी) करणे गरजेचे आहे.
लागवडीपासून १०० दिवसांनी पोटॅशियम हायड्रोजन ऑर्थोफॉस्फेट ५० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे._
*कपाशी मधे गुलाबी बोंड अळी: गेल्यावर्षी बीटी कपाशीचे ७० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान गुलाबी बोंडअळीमुळे झाले होते*
शेतकरी बांधवांनो यावर्षी या अळीचा प्रादुर्भाव हंगामी कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणावर जुलै महिन्यात दिसू लागला आहे.
यापुढेही अळी मोठ्या प्रमाणावर कापूस पिकाचे नुकसान करू शकते. वेळीच या कीडींवर नियंत्रण न मिळवल्यास आलेले पीक हातेच जावू शकते.
-यासाठी दररोज दुपारी तीन नंतर कपाशी पिकांमध्ये निरिक्षणे घ्यावीत. निरिक्षण करतांना जर एखादे फुल पिवळे दिसले तर तात्काळ ते तोडावे. अशा फुलाचे तोंड एकदम घट्ट चिकटलेले दिसेल.
यालाच डोमकळी असेही म्हणतात. अशावेळी या फुलाच्या पाकळ्या वेगळ्या केल्यास अशा फुलांमध्ये एक ते दोन गुलाबी बोंडअळ्या आपणास पहावयास मिळतील._
-तोडलेली फुले तात्काळ नष्ट करावीत.
-फवारणी करतांना
5 % निंबोळी अर्काची प्रतिबंधातमक फवारणी करावी.
– जर 8 – 10 पतंग सलग तिन दिवस प्रति सापळा किंवा 10 % प्रादुर्भावग्रस्त हिरवी बोंडे किंवा एक जिवंत अळी प्रति 10 हिरवी बोंडे / पाते आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी समजावी व खालिल कीटकनाशकांची फवारणी ताबडतोब करावी.